पाकिस्तानचा निधी रोखा   

आशियाई विकास बँकेकडे भारताची मागणी

नवी दिल्ली : पाकिस्तानला देण्यात येणार्‍या निधीत कपात करण्यात यावी, अशी मागणी भारताने आशियाई विकास बँकेकडे केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासातो कांडा यांची भेट घेतली. यासोबतच, इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जियोर्जेट्टी यांचीही त्यांनी भेट घेतली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानची चहुबाजूने कोंडी करत आहे. त्यामुळे, पाकिस्तानची मोठी पंचाईत झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली आहे. 

Related Articles